पक्ष्यांचं स्थलांतर, प्रजनन आणि मृत्यूनंतर काय? निसर्ग अभ्यासक मकरंद केतकर यांच्याशी संवाद!
दरवर्षी उरण, ठाणे, सोलापूर, नवी मुंबई, कल्याण अशा विविध भागात लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगोंसह नाना प्रकारच्या प्रजातींचे पक्षी येत असतात. हे पक्षी कुठून येतात? का येतात? त्यांचा मुक्काम किती दिवसांचा असतो? पक्षी मेल्यानंतर त्यांचं विघटन कसं होतं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर निसर्ग अभ्यासक मकरंद केतकर यांच्याकडून जाणून घेऊया