उत्तराखंडमध्ये नेमकं काय झालं? जलप्रलयाला कारण काय? निसर्गाचा रुद्रावतार 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात
उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हिमकडा तुटल्यामुळं एकच हाहाकार माजला. जोशीमठ भागात आलेल्या या आपत्तीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, तब्बल 150 जण बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येत आहे. या भागात आलेल्या या आपत्तीनंतर प्रशासनाकडून थेट हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे उत्तराखंडमध्ये अशा प्रकाच्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचं संकट ओढवण्याची ही पहिल्ची वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा इथं अनेकदाच निसर्गाचा कोप पाहायला मिळाला होता.