मूड देशाचा | आघाडी सरकारची कामगिरी कितपत समाधानी? केंद्राच्या कामावर जनता किती समाधानी? भाग 1
नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास दोन वर्ष लोटली आहेत. यंदा कोरोनाचं संकट, बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वे घेऊन देशाचा मूड जाणून घेतला. महाविकास आघाडी सरकारची एका वर्षाची कामगिरी कशी होती? महाविकास आघाडी सरकार कोरोना हाताळण्यात कितपत यशस्वी? याबाबत या सर्व्हेतून मतं जाणून घेतली गेली.