Farmer Protest | नवे कृषी कायदे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले केंद्रीय कृषीमंत्री?
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता गाजीपूर सीमेवर भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांना एक नवा फॉर्म्युला दिलाय. टिकैत यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टरवर 15 शेतकरी आणि 10 दिवसांचा वेळ घेऊन या. त्यामुळं या आंदोलनात शेतकरी सहभागी होत राहतील आणि नंतर परत जाऊन ते शेतीही करु शकतील.
Tags :
Farmer Minister Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Agriculture Minister Farmers Special Report New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest