गर्दीचे विभाजन करण्यासाठी उपाय शोधा, सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला रेल्वेचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पश्चिम आणि मध्य रेल्वेनं म्हटलं आहे की, कोरोनाच्या आधी प्रत्येक दिवसाला 35 लाख प्रवासी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करायचे, मात्र आता एका लोकलमध्ये सातशे प्रवाशी यानुसार दिवसाला 9.6 लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा, ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यसरकारने शोधला आहे त्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक रुपयासाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.