Uddhav Thackeray | शेतकऱ्यांनो घाबरु नका, लवकरच नुकसान भरपाई मिळेल : उद्धव ठाकरे | सांगली | ABP Majha
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून सत्तापेच अद्याप सुटलेला नाही. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. "शेतकऱ्यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून लवकरच नुकसान भरपाई मिळेल," असा विश्वास शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरेंसोबत या दौऱ्यात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले होते.