रोगाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोची झाडं उपटून फेकण्याची वेळ, शेतीवर केलेला लाखो रुपयाचा खर्चही वाया
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा परिसरातील अनेक टोमॅटो उत्पादक शेतकर्यांच्या सोन्यासारख्या असलेल्या टोमॅटो पिकावर नवीन विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्यांनी थेट टोमॅटोची झाडेच उपटून शेतीच्या बांधावर टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे. लाखो रुपये खर्च करुनही पदरी काहीच पडत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले असल्याचे चित्र पठारभागात पाहवयास मिळत आहेत.