कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना धक्काबुक्की

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं. त्यात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येत असताना आंदोलक आणि पोलीसांच्यात वादावादी झाली. याप्रसंगी राजू शेट्टी म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय वळण लावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश पेटवल्याशिवाय सोडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या भावना दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत आहेत."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola