‘तुमच्या चौकशा सुरु झाल्यावर रडू नका’, वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा

Continues below advertisement
वृक्षलागवडीवर आमची चौकशी लावत आहात पण तुमच्या चौकशा लागल्या तर घाबरु नका अस वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.  वृक्षलागवडीसारख्या ईश्वरी कार्यावर शंका घेणारे तुम्ही कोण? ज्यांनी झाडाचं कलम सोडाच साधं एक पान देखील लावलं नाही, त्यांनी शंका कशासाठी घ्यावी, असा थेट सवाल मुनगंटीवारांनी सरकारला केला आहे. त्यांना फक्त आम्ही केलेला विकास खुपतो असही ते म्हणाले. 'आता फक्त माझी अपेक्षा एवढीचं की, जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’ असा थेट इशारा मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला दिला आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. तर भाजप सरकारच्या काळातील वृक्षलागवडीची चौकशी करुन दाखवा, असंही मुनगंटीवार म्हणालेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram