Pandharpur Temple : भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून काळजी, चारी बाजूला पत्र्याचं मंडप

पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणार आहेत... यावेळी भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात आलीये..  विठ्ठल मंदिराच्या चारी बाजूला पत्र्याचं मंडप टाकून सावली करण्यात येणार आहे..  सध्या असलेले कापडी मंडप काढून पत्र्याचे मंडप टाकण्यात येणार आहे.. नामदेव पायरी, चौफाळा ते पश्चिम द्वार आणि संपूर्ण मंदिर प्रदक्षिणा मार्गावर पत्र्याचे मंडप उभारले जाणार आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola