Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
मला असं वाटतं की मी अत्यंत भाग्यवान आहे. मला सहा वेळा आषाढी आणि दोन वेळा कार्तिकी पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. हा विठूरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे. महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आणि कितीही कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते. शेतकऱ्यांची सेवा केली की हा निरुपयोगी पांडुरंगा पर्यंत पोहोचतो. सरकारसाठी काय मागितलं पांडुरंगा कडे? हे सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की पांडुरंगांना आपल्या मनातलं कळतं पण एक गोष्ट मात्र इथे आल्यानंतर मी सातत्याने मागत असतो कारण ही जी आषाढीची पूजा आहे ती खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा शेती चांगली टिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते. सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाई करता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आपण दोन अडीच वर्षांमध्ये कॉरिडॉर बाधित यांची याचं काम कधी सुरू होईल अशा पद्धतीचं आपला प्रयत्न असा आहे की यावर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच वर्ष त्याला लागतील पूर्ण काम व्हायला साडेतीन चार वर्ष लागतील पण महत्त्वाचं जे काम आहे ते दोन ते अडीच वर्षात आपण पूर्ण करू. आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे. 80 90 टक्के लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत. 10 20 टक्के लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत त्याही आम्ही दूर करू.