गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतरही भगत सिंह कोश्यारी राज्यपाल पदावर कसे? शरद पवारांचा सवाल

तुळजापूर : बंद मंदिरांवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली. शाहांच्या या नाराजीवर बोट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांच्या नाराजीनंतरही भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर कायम कसे असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. तुळजापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola