आधी हात जोडून बोलू, मग हात सोडून बोलू; विद्यार्थी पालक समन्वय समितीच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा इशारा
मुंबई : विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज कृष्णकुंजवर जाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. यासंदर्भात आज विद्यार्थी पालक समन्वय समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. जिम व्यवस्थापक, ग्रंथालयाचे संस्थापक, कोळी महिला, मुंबईचे डब्बेवाले आणि मूर्तिकार यांच्यापाठोपाठ आता विद्यार्थी-पालक समन्वय समितीनेही आपल्या समस्या मांडण्यासाठी कृष्णकुंज गाठलं आहे.