Prakash Ambedkar | भाजपकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर | ABP MAJHA

प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित करताना म्हटलं की, भाजपकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.  सरकारने आणलेली डिटेन्शन कॅम्पची जी पद्धत आहे, ती ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. त्यावेळी त्यांनी जो गुन्हेगारी जमात कायदा केला यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं, त्या जमातींना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यातं आलं होतं. या देशात ज्यांना शिक्षणाची दारं व्यवस्थेनं बंद केली होती, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या अलीकडच्या पिढीकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. एनआरसी या लोकांविरोधात असणार आहे. जर तुम्हाला या डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola