Uddhav Thackeray PC | भाजप-पीडीपी, भाजप-नीतीश यांची आघाडी कशी झाली?, उद्धव ठाकरेंचा सवाल | ABP Majha

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. राज्याचे राज्यपाल दयावान माणूस आहे म्हणून त्यांनी 48 तासांऐवजी सहा महिन्यांची मुदत आम्हाला दिली असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भाजपची सत्तास्थापनेची मुदत संपण्यापूर्वी आम्हाला सत्तास्थापनेसाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला. काल आम्ही राज्यपालांना भेटुन हीच विनंती केली होती की, आम्ही सत्तास्थापन करु इच्छीतो त्यासाठी आम्ही 48 तासाची मुदत मागितली होती. पण 48 तास नाही तर सहा महिने मुदत दिली असे राज्यपाल सर्व राज्यांना लाभावे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola