Ramdas Athawale | देशाच्या अन् राज्याच्या हितासाठी शरद पवार यांनी एनडीए सोबत यावं : रामदास आठवले

देशात सध्या कोरोना विषाणूचं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात ठाकरे सरकारने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरलेले आहेत, असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चाललेली आहे. सामना पेपर चालवणं हे सोपं काम आहे. मात्र, कोरोनाचा सामना करणे हे सोपे काम नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कोरोना वर उपाय योजना करण्यात सरकार कमी पडलेलं आहे.

राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राहात असून, त्याच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यात अनेक निर्णय हे राष्ट्रवादीला घेता येत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल आहे. राज्यात जरी तीन पक्षांचे सरकार असले तरी ही सेना इतर पक्षांचे ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि देशाच्या भल्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला हवा. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्या साठी शरद पवार यांनी शिवसेने सोबत राहू नये, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola