Sanjay Raut UNCUT : ST आंदोलनात अनेक 'लहान नटसम्राट'; श्रमिकांची डोकी भडकवण्याचं काम भाजपकडून सुरु

Continues below advertisement

औरंगाबाद : नवाब मलिक (Nawab Malik) हे न्यायाची लढाई लढत आहेत. ते संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं लढत आहेत.  त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. आमच्यासारख्या काही लोकांना वाटत होतं की हे सगळं थांबावं पण भाजपला जर शहाणपणा येत नसेल तर ही लढाई सुरु राहिल. अजून काहीच समोर आलेलं नाही. नवाब मलिक यांचा इंटरव्हल लांबतोय, मी एन्ट्री करणार आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. 

'खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं' असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) सर्व स्तरांतून टिकेची झोड उठली आहे. आज शिवसेनेनं सामनाच्या (Shiv Sena Saamana) अग्रलेखातून कंगनावर टीका केली आहे. सोबतच भाजप नेत्यांनाही फैलावर घेतले आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही, असं लेखात म्हटलं आहे. 

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, शिवसेनेने राष्ट्रवाद , हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात . महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो ; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू - गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे . कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ, असं यात म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram