Sanjay Raut Full : अदानीप्रकरण ते मोदींची डीग्री, शरद पवारांच्या भूमिकांवर काय म्हणाले संजय राऊत?
Sanjay Raut : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. हे ढोंग असून, त्यांना श्री रामाचा आशिर्वाद लाभणार नसल्याचे राऊत म्हणाले. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ म्हणाले होते. मात्र, शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली.