Sanjay Raut | तीन पक्षाच्या महाविकासआघाडीला 165 आमदारांचं बहुमत : संजय राऊत | ABP Majha
खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यपालांनी सरकार बनवायला दिलं असून भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला असल्याची टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 24 तासाचा वेळ दिला जातो. मात्र भाजपला बहुमत सिद्ध करायला 30 तारखेपर्यंत वेळ दिला. बहुमत आहे तर एवढा वेळ कशासाठी घेत आहेत. फोडाफोड करण्यासाठीच 30 तारखेपर्यंत मुदत दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.