Sangli Rain : वाळवा, पलूस, खानापूर, तासगावमध्ये पाऊस , परतीच्या पावसामुळे टोमॅटोचं नुकसान
सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय.. परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यासह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती
पाण्याखाली गेलीये.. टॉमेटोची पिकं आडवी झाल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय.. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीेये.