Raj Thackeray Full PC : पुण्याच्या टाऊन प्लॅनिंगवरून राज ठाकरेंची फटकेबाजी : ABP Majha

Continues below advertisement

सरकारकडे टाऊन प्लॅनिंग नाही

नदीत अनधिकृत बांधकाम झाल्यामुळेच पूरस्थितीची घटना घडली. सरकारने मदत करणे गरजेचे आहे, वाऱ्यावर सोडून चालणार नाही. सरकारकडे टाऊन प्लॅनिंग काही नाही, 
अचानक जास्त पाणी सोडल्याने ही घटना घडली, घरात पाणी शिरले. कोणत्याही शहरात टाऊन प्लॅनिंग चालवलं जातं नाही. दिसली जमीन की विक, असंच चालू आहे. नेक्सस चालू आहे. एक पुणे नाही तर पुण्यात पाच पाच शहर झाली आहेत, असे म्हण राज ठाकरेंनी पुण्याच्या विस्तारीकरणावर भाष्य केलंय. 

निवडणुका नाहीत, नगरसेवकच नाहीत

कमी काळात विस्तार झालाय, विचित्र आहे अद्भुत आहे. केंद्र सरकार, राज्यातील निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाही, त्यामुळे जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल राज यांनी विचारला आहे. तसेच, ही सगळी जबाबदारी प्रशासनाची असल्याचंही ते म्हणाले. बाहेरुन येणाऱ्यांना फुकट घर दिली जात आहेत,आणि इथल्या लोकांना बेघर केलं जातं आहे. याला सरकार चालवणे म्हणतात का?, असा सवाल राज यांनी विचारला. आपल्या राज्याचा कुठं विचार केला जाणार आहे का नाही. या विषयी बैठक होईल मुंबईला, मग तुमच्याशी परत बोलेन. पण, पुणे सारख्या शहरात साफसफाईला पनवेल आणि ठाण्यामधून लोक मागवावे लागतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अधिकाऱ्यांच निलंबन होऊन काही होणार नाही,प्रश्न सुटणार नाही.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram