Sharad Pawar PC | विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, शरद पवारांची पत्रकार परिषद | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2019 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीए, अनेक विमा कंपन्या त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, विमा कंपन्यांनी आता शेतकऱ्यांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.