Navratri Utsav निमित्त मोदी सरकारची मोठी भेट, मोफत धान्य योजनेचा कार्यकाळ 3 महिन्यांनी वाढवला
दसऱ्याआधी मोदी सरकारनं एक मोठी भेट दिलीय.... देशातील कोट्यवधी शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत धान्य योजनेचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय झालाय. तसंच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात मोदी सरकारचं हे मोठं गिफ्ट आहे.