उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, शिवसेना आमदारांची प्रतिक्रिया | मुंबई | ABP Majha
अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं जाणार असेल तरच भाजप नेत्यांनी फोन करावा, अशी टोकाची भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान जे ठरलं तेच व्हावं, या भूमिकेवर शिवसेना अजूनही ठाम आहे. आज मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडल्याचं समोर आलंय. आपल्याला स्वत:हून युती तोडायची नाही.