Babanrao Taywade On Manoj Jarange : मनोज जरांगे ओबीसी समाजात असंतोष निर्माण करत आहेत : तायवाडे
EWS तुम्हाला घ्या, त्याच्या बदल्यात आम्हाला १०% आरक्षण द्या असं जरांगेंनी म्हटलंय. ईडब्ल्यूएस म्हणजे न पिकणारं वावर असल्याची टीका त्यांनी केलीय. मराठा समाजाने ओबीसी ऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर फायदा होईल अशी मांडणी केली जात होती. त्याला जरांगेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. तर जरांगे ओबीसी जनतेत रोष निर्माण करत आहेत, अशी टीका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलीय. ओबीसींनी कोणाचं आरक्षण खाल्लं हे जरांगेंनी सांगावं असं आव्हान त्यांनी दिलं.