Rahul Gandhi Congress : आजपासून भारत जोडो न्याय यात्रेला मणिपुरमधून सुरुवात : ABP Majha
Continues below advertisement
भारतो जोडाच्या यशानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. थोबल येथील जाहीर सभेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात होईल. ही यात्रा देशातील १५ राज्य आणि ११० जिल्ह्यातून जाईल. ६७ दिवसांच्या यात्रेत राहुल गांधी ६ हजार ७०० किमी एवढा प्रवास करतील. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पायीच पूर्ण केली होती. पण यावेळेसची भारत जोडा न्याय यात्रा पायी आणि बसमधून पूर्ण केली जाणार आहे. लांबचं अंतर बसमधून पार केलं जाणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement