Jan Ashirwad यात्रेमुळे Thackeray सरकार घाबरलंय,महाविकास आघाडी भुईसपाट; भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
मुंबईतल्या जनआशीर्वाद यात्रेचा टप्पा पूर्ण करुन नारायण राणेंचा रथ आता कोकणात दाखल झालाय.. पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात झाली.. कोकणात भाजप सोडून इतर कोणाचीच सत्ता येणार नाही असा निर्धार राणेंनी एबीपी माझाकडे बोलून दाखवला. राणेंच्या कोकणातल्या जनआशीर्वाद यात्रेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुनील देवधरही सहभागी झालेत. या दोन्ही नेत्यांनी देखील ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं