EXCLUSIVE | ... त्यावेळी एकनाथ खडसेंनी खंजीर खुपसला नाही का? : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावणकुळे यांना तिकिट द्यावं यासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात ते फार महत्वाचे नेते आहेत. मात्र त्यांना केंद्रातील वरिष्ठांनी तिकिट नाकारलं. खडसे यांना का नाकारलं असं त्यांना विचारण्याइतके आम्ही मोठे नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. त्यांनी आजवर अनेकांना डावलून घरात तिकिटं दिली, त्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा सवाल देखील पाटील यांनी केला आहे.
Continues below advertisement