Balasaheb Thorat | जेवढी भरती मोठी, तेवढी ओहोटी मोठी : बाळासाहेब थोरात | ABP Majha
भाजपमधील नाराज नेत्यांवर बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही सक्षम नेते होते. दुर्दवाने त्यांना दूर लोटलं. जेवढी भरती मोठी तेवढी ओहोटी मोठी, हा निसर्गाचा नियम आहे, हे होणारच. काहीजण अस्वस्थ आहेत, ती आम्हाला पण जाणवते. जे गेले त्यांना वाटतं चुकीच्या वेळी गेलो. परत येण्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. पण नेते अस्वस्थ आहेत हे नक्की.