Jaipur Mumbai Express Firing News : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला, यामध्ये आरपीएफच्याच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय.. जयपूर एक्सप्रेसच्या बी-५ या डब्यात पहाटे पाच वाजून २३ मिनिटांनी वापी आणि मीरा रोडदरम्यान ही घटना घडली. हल्ला करणाऱ्या हवालदाराचं नाव चेतन परमार असल्याचं कळतंय, तो सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे. त्याला बोरिवलीत आणण्यात आलं आहे. चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. ट्रेन वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन परमार आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतरा राग आला, की त्यानं प्रवाशांवर बंदूक उगारली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता, आणि त्यानं त्याच्या वरिष्ठासह प्रवाशांवरही गोळीबार केला