Palghar Chinchpada : पालघरच्या चिंचपाडा पुलामुळे प्रचंड वाहतूक कोंडी Mumbai Gujarat Highway

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील चिंचपाडा येथील पुलाला भगदाड पडल्यानंतर आजही या पुलाची स्थिती तशीच आहे. संबंधित प्रशासनाकडून पुलाची कोणतीही दुरुस्ती सुरू करण्यात आलेली नाही. फक्त बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत मिळते. जवळपास तीन ते चार किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा सातत्याने पाहायला मिळतात. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतोच शिवाय वाहतूक कोंडीमुळे चालक-प्रवाशांचा मनस्तापदेखील वाढतोय. याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola