
'युद्ध झाल्यास भारताविरोधात अणुबॉम्ब वापरू'; पाकिस्तानी मंत्री शेख रशिद बरळले
Continues below advertisement
इस्लामाबाद : पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशिद यांनी भारता विरोधात अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. भारतासोबत सुरु असलेल्या तणावपूर्ण संबंधांबाबत बोलताना रशिद यांनी थेट दावा केला आहे की, पाकिस्तानने आपलं हत्यार तयार ठेवलं आहे आणि जर भारताने हल्ला केला, तर पारंपारिक युद्ध होणार नाही, थेट अणुबॉम्ब वापरू, ज्यामध्ये आसामलाही निशाणा केलं जाऊ शकतं.'
दरम्यान, शेख रशिद यांनी भारताविरोधात बरळ ओकल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका टीव्ही चॅनलला देण्यात आलेल्या इंटरव्ह्यू दरम्यान, वैश्विक राजनितीची समीकरणांवर बोलताना शेख रशीद म्हणाले होते की, आज चीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनच्या विरोधात उभा आहे. तर आपले नवे मित्र नेपाळ, श्रीलंका, इराण आणि रशियासोबत नवा ब्लॉक तयार करत आहे. रशिद म्हणाले की, अशातच पाकिस्तानलाही चीनसोबत उभं राहणं गरजेचं आहे.'
दरम्यान, शेख रशिद यांनी भारताविरोधात बरळ ओकल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका टीव्ही चॅनलला देण्यात आलेल्या इंटरव्ह्यू दरम्यान, वैश्विक राजनितीची समीकरणांवर बोलताना शेख रशीद म्हणाले होते की, आज चीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनच्या विरोधात उभा आहे. तर आपले नवे मित्र नेपाळ, श्रीलंका, इराण आणि रशियासोबत नवा ब्लॉक तयार करत आहे. रशिद म्हणाले की, अशातच पाकिस्तानलाही चीनसोबत उभं राहणं गरजेचं आहे.'
Continues below advertisement