कोरोनाची साखळी तुटली तर प्रत्येकाला लस देण्याची गरज नाही, ICMR चे अध्यक्ष बलराम भार्गवा यांची माहिती
मुंबई : जगभरात विविध कंपन्या कोरोना लस पहिल्यांदा बाजारात आणण्यासाठी स्पर्धा करत आहेत. तर दुसरीकडे कोरोना लस पहिल्यांदा मिळावी यासाठी लॉबिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात प्रथम लस देण्यात येणाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरु आहे. या यादित नाव टाकण्यासाठी राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी फिल्डींग लावत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना हा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावला आहे.