#FarmerProtest कोणताही प्रोपगंडा देशातील ऐक्याला बाधा पोहोचवू शकत नाही, गृहमंत्री अमित शाहांचं ट्वीट
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या वक्तव्याला कोट करत त्यांनी लिहलंय की कोणताही प्रोपागंडा देशातील ऐक्य बाधित करू शकत नाही. ते म्हणाले की कोणताही प्रोपागंडा देशाला उंचावर जाण्यापासून रोखू शकत नाही. भारताच्या प्रगतीसाठी सर्वजण एकजूट आहेत.