कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं भाषण

मुंबई : नैसर्गिक आपत्तीत राजकारण केलं जातंय पण ते क्लेशकारक आहे. कॅबिनेट काय असतं ते मला मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर कळतंय, मला सर्वाचं सहकार्य लाभतंय. यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. सोनियाजी फोन करून विचारतात काम कसं चाललय याची विचारपूस करतात. “हमारे लोग सताते तो नहीं ना?”असंही त्या विचारतात. मग मी तिथे तुमची (कॉंग्रेस) बाजू लावून धरतो आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त नाही, असे उत्तर देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola