Bhadant Rahul Bodhi | राजकर्त्यांनो जबाबदारी ओळखून वागा, डॉ. भदन्त राहुल बोधी यांचं आवाहन | ABP MAJHA

महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर सध्या सुरू असलेला सत्तापेच आपण सारेच पाहतोय. ज्यांना जनादेश मिळाला त्यांच्यात मतभेद आहेत. विचारसरणीला न मानता विचित्र युत्या-आघाड्या होतील की काय, अशी स्थिती आहे. राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. विकासाचे, जनहिताचे अनेक निर्णय घ्यावे लागणार आहेत. जनतेला मात्र कुणाच्या तोंडाकडे पाहायचं हाच प्रश्न पडलाय. 
 
या स्थितीनं व्यथित होऊन डॉ. भदन्त राहुल बोधी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सारासार विचार करण्याचं, जबाबदारी ओळखून वागण्याचं आवाहन केलंय. त्यांचं हे आवाहन ध्वनिफीतीच्या स्वरूपात आम्ही इथे देत आहोत. आशा आहे की सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि सामान्यजनही यावर विचार करतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola