Navneet Rana on Protest | राजकीय पक्षांनी शेतकऱ्याला पुढे करून हे आंदोलन केलं आहे - नवनीत राणा
नवी दिल्ली : कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या 13 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांकडून नवे कृषी कायदे रद्द करण्याती मागणी केली जात आहे. अशातच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. परंतु, ही बैठकही निष्फळ ठरली असून सरकारने कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांची आज केंद्र सरकारसोबत बैठक होणार नाही. यासंदर्भात आज सकाळी साडेदहा वाजता मोदी सरकाच्या कॅबिनेटची बैठक होणार आहे.