Navi Mumbai : मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी माथाडींचं एकदिवसीय उपोषण, आंदोलनाची भूमिका ठरणार

Continues below advertisement

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद राहणार आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व माथाडी कामगारांनी एकत्रित येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज फळ मार्केट, फूल मार्केट, मसाला मार्केटसह सर्व मार्केट बंद राहणार आहे. अत्यावश्यकमध्ये येणारे भाजीपाला आणि फळ मार्केट बंदमधून वगळण्यात आलंय. दरम्यान, कांदा बटाटा मार्केटमध्ये सकाळी १० वाजता माथाडी कामगार मेळावा होणार असून आमदार शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची भूमिका ठरणार आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram