swachh bharat abhiyan | स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षणासाठी खटाटोप | नाशिक | ABP Majha
नाशिक शहरात सध्या सर्वत्र स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत कुठे स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देण्यासाठी भिंती रंगविण्यात आल्यात कुठे दुभाजकवरची माती स्वच्छ केली जातेय तर कुठे मनपा कर्मचारी हातात झाडू घेऊन रस्ते साफ करत असल्याचं दर्शन कधी नव्हे नाशिककरना घडतंय.. मनपचा हा सारा खटाटोप सुरू आहे स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षणात चांगले मानांकन प्राप्त करण्यासाठी.
मागील वर्षी मानांकनात 16 व्या स्थानी असणाऱ्या शहराला पहिल्या दहा मध्ये आणण्यासाठी मनपा कर्मचारी झटून कामाला लागले आहेत, नागरिकांवर दण्डत्मक कारवाई केली जात असून आतापर्यंत 660 नागरिकांकडून 6 लाखहुन अधिक दंड वसूल करण्यात आलाय
मागील वर्षी मानांकनात 16 व्या स्थानी असणाऱ्या शहराला पहिल्या दहा मध्ये आणण्यासाठी मनपा कर्मचारी झटून कामाला लागले आहेत, नागरिकांवर दण्डत्मक कारवाई केली जात असून आतापर्यंत 660 नागरिकांकडून 6 लाखहुन अधिक दंड वसूल करण्यात आलाय