Nashik : पावसाची ओढ, शेतकरी चिंतेत; पिकांना तांब्याने पाणी देण्याची वेळ Maharashtra Rain
एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधक करतायत तर, शेतकऱ्यांकडूनही ही मागणी होतेय.. राज्यात खरच दुष्काळजन्य परिस्थिती आहे का? हे बघण्यासाठी एबीपी माझाची टीम नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात पोहोचली...यावेळी एक भीषण वास्तव समोर आलंय... ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आलाय मात्र पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात चक्क पिकांना तांब्याने पाणी देण्याची वेळ आलीय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...