शरद पवर यांना मोठं करण्यासाठी दिल्लीत संमेलनाचा घाट; कौतिकराव ठाले पाटील यांचा गंभीर आरोप
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
25 Jun 2021 09:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवर यांना मोठं करण्यासाठी दिल्लीत संमेलनाचा घाट घातला होता; असा गंभीर आरोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. महामंडळाच्या अक्षरयात्रा या वार्षिक अंकातून ठाले पाटील यांनी नाशिकमधील नियोजित 94व्या साहित्य संमेलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.