सप्तश्रृंगी मंदिर 5 महिन्यांपासून बंद, अर्थकारण ठप्प, अनेकांवर गाव सोडण्याची वेळ

Continues below advertisement
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अद्याप मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. साडेतीन शक्तीपिठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेले वणीचे सप्तश्रृंगी देवी मंदिर देखिल 5 महिन्यांपासून बंद आहे, सप्तश्रृंगीच्या या नांदूरी गडावर साधरणतः 600 छोटे मोठे व्यावसायिक असून येणाऱ्या भाविकांवरच इथले सर्व उद्योगधंदे अवलंबून असल्याने गावचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्य-प्रसाद विक्रेते, हॉटेल्स-लॉजेस, टॅकसीचालक अशा सर्वांचाच यात समावेश आहे. धक्कादायक म्हणजे उपासमारीची वेळ आल्याने अनेकांना गाव सोडून जाण्याचीही वेळ आली असल्याच गावकरी सांगत असून एकट्या मंदिर ट्रस्टला अंदाजे साडेपाच कोटी रुपयांचा फटका बसलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram