Jal Jeevan Mission Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम अपूर्ण : ABP Majha
सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशनच्या कामांचे उद्घाटन केलं. मात्र नंदुरबार जिल्ह्यात जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दीड वर्ष उलटूनही जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्ण आहे.. त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. या योजनेवर जिल्ह्यात लोकप्रतिनिधींपासून स्थानिक नागरिकांनी आरोप केले आहेत त्यामुळे ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे