Nagpur : संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत, 3 ते 4 दिवसांपासून बागेत संत्र्यांची गळती सुरू
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 10:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या विदर्भातला संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. अमरावती जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून संत्रा बागांमध्ये मोठ्याप्रमाणात फळांची गळती होतेय. त्यामुळे मागील वर्षांपासून ही फळगळती ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये होते. अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात संत्रा उत्पादकांनी या फळगळतीची समस्या कायमची सोडवण्यासाठी नागपुरातील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनं दिली. परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचं संशोधन करण्यात आलं नसल्यानं शेतकऱ्यांना सतत नुकसान सोसावं लागतंय.