Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही, बुलडोझर चालवून एका दिवसात माफिया संपवून टाकलं, नालासोपारा इथल्या सभेत योगी आदित्यनाथांंचं वक्तव्य तर काँग्रेसह इतर विरोधीपक्षांवरही साधला निशाणा.
चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते
140 कोटी जनतेच्या धार्मिक भावनेच्या आधारावर श्रीराम मंदिर बांधले गेले. काँग्रेस सरकार म्हणायचं की, हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर दंगे होतील पण हा नवा भारत आहे. रामलल्ला आयेंगे, मंदिर वही बनायेंगेचा आमचा संकल्प होता आणि मंदिर बांधले. यासाठी महाराष्ट्रातील हजारो कारसेवकांचे योगदान आहे. काँग्रेसचे सरकार पुन्हा येण्याचे लायकीचे राहणार नाही. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. अबकी बार चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते. काहीच संदेह ठेवू नका, पुन्हा मोदी येणार आहे. मालेगाव, धुळे येथील बांधवांना अयोध्या येथे राम मंदिर दर्शनाला या, असे आवाहन त्यांनी केले.