Engineering Revaluation Exam : इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाची पुनर्मूल्यांकनाच्या निकालाआधीच परिक्षा
मुंबई विद्यापीठाकडून इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या एटीकेटीच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालाआधीच परीक्षा घेतली जातेय. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. इंजिनिअरिंगच्या एटीकेटीच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालाआधी हजारो विद्यार्थी आजपासून परीक्षा देणार आहेत. ९० दिवसांनंतरही विद्यार्थ्यांच्या हातात पुनर्मूल्यांकनाचा निकाल आलेला नाही. अवघ्या ४८ तासांआधी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देऊन सोमवारपासून परीक्षा असल्याचं सांगितलं. विद्यापीठाच्या या निर्णयाला युवासेनेनं विरोध केलाय.