Vegetable Price Hike | पावसामुळे भाज्या महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2020 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे आज भाजीपाल्याच्या किंमती कडाडल्या आहेत. सततच्या पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. कधी नव्हे ते पालक, मेथी, मिरची, टोमॅटो दुपटीपेक्षा जास्त दराने आज मार्केटमध्ये विकले जात आहे. मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्येही हीच स्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना आता भाज्यांचे भाव कडाडल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहक दोघांनीही नाराजी व्यक्त केली आहे.