Vasai Rains : वसईमध्ये मिठागराची वस्ती पाण्याखाली, जवळपास 125 कुटुंब पाण्यात
रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार नालासोपारा भागात पाणीच पाणी साचलं आहे. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता साडे दहा वाजले तरी पाणी ओसरण्याच नाव घेत नाही. रात्री अचानक पाणी साचलं, त्यामुळे कारखानदार, दुकानदार, तळ मजल्यावरील अनेक घरात अचानक पाणी आलं. त्यात सर्व जण झोपेत असल्याने समान वाचवण्यासाठी कुणालाही वेळच मिळाला नाही. मोठया प्रमाणात नागरीकांचं नुकसान झालं आहे.