Uddhav Thackeray Vikroli Speech : सरकार आलं तर त्यांना सोडणार नाही; उद्धव ठाकरे कडाडले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसलांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. तर मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना आपलं सरकार आल्यानंतर सोडणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय.
मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन
ते पुढे म्हणाले की, हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातो. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले. अहो, मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन? माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही. त्यांनी पुढे म्हणाले की, मोदी मुंबईला भिकारी करू पाहत आहेत. घाटकोपरमध्ये रोड शो झाला, तो हिणकस होता. आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळला. त्यात नेमके किती मृत्यू झाले, हा खरा आकडा समोर नाही. त्याच्याच बाजूला फुलांची उधळण करून, मोदींचा रोड शो काढण्यात आला. कशासाठी? सांत्वन करायला केलं का हे? या रॅलीसाठी मुंबई पालिकेने खर्च केला, असा आरोपही त्यांनी केला.