Uddhav Thackeray at Matoshree : इतके लोक सोडून गेले तरी शिवसेना संपली नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला एक आवाहन केलं. आमचे बिनकामाचे शिवसैनिक अशाच पद्धतीनं फोडत राहा, असं केलं की आमचे खरे शिवसैनिक पेटूनउ उठतात, असं ठाकरे म्हणाले. मुंबईतील सायन मतदारसंघातले कार्यकर्ते आज ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यांच्याशी बोलताना ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली. एवढे लोक सोडून गेले तरी शिवसेना संपत नाही, त्यामुळे बंडखोरांना तीळपापड होतो, असं ठाकरे म्हणाले.